मार्चपासूनच आपल्याकडे दुष्काळाचे हाकारे पिटले जातात. दरवर्षी नित्यनेमाने हे घडतेय. दुष्काळ-दुष्काळ म्हणत लोक का घुमत राहतात, हे कोडे सुटणे अशक्यच. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ असे उपरोधिक; पण वास्तव दर्शन घडवणारे पुस्तक पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेय. दुष्काळावर शेकडो समित्यांनी अहवाल दिले; पण या प्रश्नाची दाहकता कमी होताना दिसत नाही. सर्वच माध्यमे दुष्काळाबाबत ओरड करण्यात नेहमीच तत्पर असतात. वृत्तपत्रांना तर पर्वणीच मिळते. रकानेच्या रकाने भरून दुष्काळाला प्रसिद्धी दिली जाते. …
Read More →