सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची बांधकामे, प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा उशीर, मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणारा प्रकल्पांवरचा खर्च
या सर्वाचा परिणाम शेवटी सिंचन व्यवस्थापनावर होतो. शेतीला पाणी न मिळणे, कमी मिळणे, उशिरा मिळणे, पाणी वाटपात अकार्यक्षमता व विषमता असणे, समृद्धीची बेटे निर्माण होणे यामागे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या कोठेतरी ‘सिंचन घोटाळा’ असतो. म्हणून शेतकर्यांनी तो नीट समजून घेतला पाहिजे. त्यादृष्टीने सिंचन श्वेतपत्रिकेचा तपशील या लेखात दिला आहे. …
