Review Category : कृषिपर्यटन

शेती हा अर्थव्यवस्थेचा चिंतेचा विषय आहे. शेतीचा जीडीपी मधील वाटा १५ टक्क्यापर्यंत घटला तरी देशाची निम्मी लोकसंख्या अर्थार्जनासाठी शेतीवरच अवलंबून आहे.

Read More →

कृषिपर्यटन हा आता जोडधंदा झालाच आहे. पुणे, खोपोली, सोलापूर, बारामती, जालना, लातूर, नागपूर, खान्देश या भागांत काही चांगले केंद्र उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे शेतकर्‍यांनीच आपल्या शिवाराला पर्यटन केंद्राचे स्वरूप दिलेय. कशी असावी ही केंद्र? नफा त्यातून कसा मिळवावा? पर्यटक कसे आणावेत या केंद्रांवर? आपला शेतमाल त्यांना कसा विकता येईल? अशा अनेक गोष्टींची उकल या पाक्षिक सदरातून होईल. जळगावात स्वतःचे आर्यन पार्क हे आधुनिक शिवार उभे करून यशाचा वेगळा मार्ग दाखवणार्‍या शेतकरी महिला डॉ. रेखा महाजन या सदरातून विविध उपाय-सूचना सांगतील.

Read More →

कृषी पर्यटनामुळे पर्यटकांची सोय होतेच; पण मुख्य म्हणजे शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायाचे हक्काचे साधन उपलब्ध होते. एखाद्या दुष्काळात पिकाने हात दिला नाही, तरी कृषी पर्यटन, दुग्धोत्पादन यांसारखे व्यवसाय त्याला दिलासा देतात, ताजा पैसा मिळवून देतात. त्यामुळेच राज्यातील अनेक शेतकर्‍यांनी शेतीला कृषी पर्यटनाची जोड देऊन समृद्धी मिळवलीय. ‘आधुनिक किसान’च्या शेतकरी वाचकांनी या पूरक व्यवसायाची वाट चोखाळावी आणि समृद्ध व्हावे, या उद्देशाने हा व्यवसाय करणारे शेतकरी आणि त्यांनी वापरलेले, हाताळलेले तंत्र यांची माहिती देत आहोत.

Read More →