शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी विभागातर्ङ्गे शहरी भागांमधील ग्राहकांसाठी ‘धान्य महोत्सव’ आयोजित केले जात आहेत. शेतकरी व ग्राहक यामध्ये असणारी दलालांची साखळी कमी करून दोघांनाही योग्य मोबदला मिळावा, हा हेतू या ‘धान्य महोत्सवा’मागे आहे. या महोत्सवामुळे काही ठिकाणी शेतकर्यांचा आणि ग्राहकांचा ङ्गायदा होत असला तरी, काही ठिकाणी शेतकर्यांऐवजी व्यापारी लॉबी ‘धान्य महोत्सवा’त शेतकर्यांच्या नावाने विक्री करत आहे. या वास्तवाची प्रचिती अहमदनगर येथे झालेल्या ‘धान्य महोत्सवा’त आली. या वास्तवाचा वेध घेणारा हा लेख…
अहमदनगर येथे नुकताच ‘धान्य महोत्सव’ पार पडला. धान्य महोत्सव शेतकर्यांसाठी भरविला होता की, व्यापार्यांसाठी असा प्रश्न निर्माण होत होता. महोत्सवामधील अर्ध्याहून अधिक स्टॉलवर व्यापार्यांनीच शेतकर्यांच्या आडून कब्जा मिळविला होता. धान्य महोत्सवात ग्राहक थेट शेतकर्यांकडून खरेदी करतो. मालाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून शेतकर्यांना चार पैसे अधिक देतो. बाजारापेक्षा आपणाला नक्कीच थोडा का होईना, स्वस्तामध्ये गुणवत्तापूर्ण शेतीमाल मिळतो आहे, असा ग्राहकांचा समज असतो. या गोष्टीचा ङ्गायदा शेतकर्यांना मिळण्याऐवजी शेतकर्यांच्या रूपात व्यापारी पुढे सरसावले आहेत. शेतकर्यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापार्यांनी भुरट्या मार्गाने धान्य महोत्सवात प्रवेश मिळविला आहे. शेतकर्यांच्या शेतमालाची व्यापार्यांमुळे मोठी हेळसांड व अवहेलना झाली व त्यांचे नुकसान झाले.
धान्य महोत्सवात विक्रीसाठी शेतमाल आणणारा व्यक्ती हा शेतकरी आहे की अन्य कुणी याची शहानिशा करण्याची जबाबदारी आयोजकांची होती. आयोजकांचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने या महोत्सवात व्यापारी घुसले. व्यापार्यांनी ‘विक्रीचे पॉईंट’ ध्यानात घेऊन आपले स्टॉल बुक केले. विशेष म्हणजे व्यापार्यांनी मध्य प्रदेशमधील इंदौरचा गहू या महोत्सवात मोठ्या
प्रमाणावर विकला. बाजारभावाचा अंदाज असल्याकारणाने व्यापार्यांनी शेतकर्यांनी आपल्या शेतमालाला लावलेल्या दराचे गणित ओळखून अधिक विक्री करण्याच्या उद्देशाने शेतमालाचे भाव पाडले. यामुळे शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांच्या मालाची अधिक विक्री झाली. ही बाब काही शेतकर्यांनी आयोजकांच्या लक्षात आणून दिली. यावर आयोजकांनी मात्र जाणूनबुजून कानाडोळा केल्याचे चित्र होते. या महोत्सवात विक्रीसाठी पन्नासहून अधिक व्यापार्यांची संख्या होती आणि त्यांच्यावर कारवाई केली तर ‘धान्य महोत्सव’ रिकामा होईल, ही भीती आयोजकांना वाटत होती. शेतकर्यांना या ठिकाणी विक्रीसाठी प्रोत्साहित करण्यात कृषी विभाग या ठिकाणी अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले.
या महोत्सवात सुयोग्य व्यवस्थापनाचा अभाव जाणवत होता. शेतकर्यांना विक्रीसाठी केवळ कापडी मंडप उभारून दिले होते. एप्रिल-मे हे महिने अवकाळी पावसाचे असतात. यादृष्टीने शेतकर्यांच्या शेतमालाची पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी काहीच उपाययोजना येथे नव्हत्या. शेतमालाची चोरी वा इतर नुकसानीबाबतच्या उपाययोजना आखणे आवश्यक होते. शेतकरी-ग्राहक थेट विक्रीसाठी ‘धान्य महोत्सव’ हा अत्यंत गरजेचा उपक्रम आहे मात्र, यातून शेतकर्यांचा
शेतमाल थेट विक्री होणे गरजेचे आहे.
*
- योगेश थोरात
Read More →