Review Category : ऍग्री बिझनेस

उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याकडेच अनेकांचा ओढा असतो. आज मराठी माणसांची हीच मानसिकता बनली आहे. तरीही काहीतरी वेगळे करून दाखविण्याची ऊर्मी असलेली मंडळी नव्या वाटा शोधून समाजासमोर आदर्श ठेवतात. त्यापैकीच एक म्हणजे निघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) या गावचा राहुल रसाळ. त्याने शेती करण्यासाठीच कृषी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. प्रयोगशील राहुलने निघोजसारख्या दुष्काळी भागात यंदा निर्यातक्षम द्राक्ष पिकवून अरेबिक देशांतील दुबईच्या बाजारपेठेत पाठविले आहेत.

Read More →

करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या शहरांमध्ये करवंदाची विक्री करतात. करवंदावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात व त्यातून अधिक अर्थार्जन होते. या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर एक चांगला उद्योग डोंगराळ भागातील शेतकर्‍यांसाठी उभा राहू शकतो.

Read More →

उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे युवक उद्योग चालू करू शकत नाहीत. म्हणून या लेखामध्ये विविध प्रकारची बिस्किटे कशी बनवायची, याची सखोल माहिती तसेच यासाठी आवश्यक साधनसामग्री व अन्नप्रक्रिया उद्योगासाठीचे शासकीय कार्यालयांचे पत्ते माहितीस्तव देत आहोत. शेतकरी युवक व बचतगट असे उद्योग यशस्वी करू शकतील.

Read More →

अलिकडे अनेक शेतकरी आल्याची (अद्रक) लागवड करून चांगले उत्पादनही घेत आहेत. साधारणत: तीन चार वर्षांपूर्वी काही शेतकर्‍यांना आले लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळाले. त्यामुळे बरेच शेतकरी या उत्पादनाकडे वळाले. परिणामी, उत्पादन वाढले आणि आल्याची किंमत घसरली. शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले. असे घडू नये, यासाठी आल्यावरील प्रक्रियेचा विचार करणे गरजेचे आहे. आल्यापासून तेल तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक आहे.

Read More →

जगभरात फळांपासून बनवलेल्या व त्याचप्रमाणे कार्बोनेटयुक्त सौम्यपेयांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा उत्पादनांसाठी भारत देश ही मोठी बाजारपेठ आहे. उसाच्या रसाकडेदेखील आता एक बाटलीबंद पेय म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. आपला देश ऊस उत्पादनात जगात ब्राझीलपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या उसाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन व साखर कारखान्यांकडून ऊसतोडीसाठी होणारी दिरंगाई यामुळे गूळ बनविण्यासाठी उसाचा काही प्रमाणात वापर होतो आहे; परंतु या पदार्थांना फारसे भवितव्य नाही.

Read More →

केळीची तोडणी केल्यापासून ती ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत सुमारे ३०-४० टक्के फळांचे नुकसान होते. केळीची साठवण क्षमता कमी असल्याने शेतकर्‍यांना आलेले उत्पादन तात्काळ विकावे लागते. त्यातून त्यांना कधी कधी उत्पादनखर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत केळीवर प्रक्रिया करून तिचे मूल्यवर्धित पदार्थांमध्ये रूपांतर केले, तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. यादृष्टीने तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने अनेक मूल्यवर्धित पदार्थांच्या पद्धतीचे प्रमाणिकरण केले आहे. त्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही पदार्थांची ही माहिती.

Read More →

जगात केळी उत्पादनात भारत, ब्राझिल, इंडोनेशिया, ङ्गिलिपाईन्स, चीन, इक्वाडोर हे देश अग्रेसर आहेत. या देशांच्या तुलनेत केळी उत्पादनात भारत अग्रस्थानी अग्रेसर आहे. केळी निर्यातीमध्ये भारताचा ४२ वा क्रमांक लागतो. भारतातून प्रामुख्याने अरब देश व शेजारील देशांना केळीची निर्यात केली जाते. केळी निर्यातीची योग्य काळजी घेतली तर भारतीय शेतकर्‍यांनाही निर्यातीत संधी आहे.

Read More →