Review Category : कायद्याच्या गोष्टी

एका गावातून कालवा (कॅनॉल) जाणार होता. कॅनॉलसाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी येऊन गावात सर्व्हे करू लागले. एका जमिनीच्या मोजणीसाठी सर्व्हेअर गेल्यावर रामचंद्र नावाच्या शेतकर्‍याने त्यांना विनंती केली की, साहेब, कॅनॉल जरा वरच्या बाजूला घेतला तर आमच्या जमिनीचे नुकसान थोडे कमी होईल. त्यावर इंजिनियरने कॅनॉलचे काम थोडे वरच्या बाजूने सरकावण्याचा निर्णय घेतला. वरच्या बाजूची जमीन आमचीच आहे, असे सांगून प्रत्यक्षात आपला चुलत भाऊ सखारामची जमीन कॅनॉलमध्ये जाईल, अशी सोय रामचंद्रने केली होती. जिल्ह्याच्या गावी नोकरी करणार्‍या सखारामला आपल्या जमिनीतून कॅनॉल जाणार, हे समजले तेव्हा फार उशीर झाला होता! शिवाय, कॅनॉल हा लेव्हलप्रमाणे आपल्याच शेतातून गेला याबद्दल त्याला आश्‍चर्य वाटले नाही.*

तात्पर्य ः
आम्ही एकत्र आहेत, असे दाखवून भूसंपादनासाठी भावाचे क्षेत्र दाखविणारा माणूस कलियुगात फारसा दुर्मिळ नाही.

Read More →

दत्तकपत्राचा एक वाद १९१५ साली दोन शेतकर्‍यांमध्ये सुरू झाला. करण्यात आलेले दत्तकविधान चुकीचे असून, वारस म्हणून आपलाच जमिनीत हक्क आहे, असे हे भांडण सुरू होते. हा वाद तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालला. तोपर्यंत १९६९ साल उजाडले. त्यानंतर जमिनीत कूळ असून, कुळाचा हक्क ठरविल्याशिवाय हे भांडण सुटणार नाही, असा नव्यानेच युक्तिवाद केला गेला व त्यानंतर हे भांडण कुळकायद्याखालील वाद म्हणून महसूल कोर्टात सुरू झाले.

Read More →

shekhar-gaikwadएकत्र कुटुंबातील थोरल्या भावाने आपले भाऊ लहान असतानाच आपल्या जमिनीचे स्वतःला सोयीस्कर असे वाटप करून घेतले. वाटपामध्ये आपल्याला दीड एकर जमीन जास्त येईल, अशी दक्षता घेतली. काही वर्षांनंतर त्याचे धाकटे भाऊ सज्ञान झाल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. मग धाकटे भाऊ या विषयाची सर्वत्र चर्चा करू लागले. त्यामुळे घरात व नातेवाईकांमध्ये या विषयाबद्दल चर्चा सुरू झाली. हे लक्षात आल्याबरोबर आपले बिंग फुटू नये म्हणून थोरल्या भावाने एक एकर जमीन गावातील शाळेला दान देण्याचे लेखी पत्र दिले. थोड्या दिवसांनी दानशूर असलेल्या भावाचा शाळेला जमीन दिल्यामुळे गावात मोठा सत्कार झाला. तेव्हा दोघेही धाकटे भाऊ आपल्या थोरल्या व दानशूर भावाबद्दल मनातल्या मनात नावे ठेवत होते; कारण दान देऊनसुद्धा हुशारीने त्याने अर्धा एकर जास्त जमीन स्वतःच्या नावे ठेवली होती.
तात्पर्य ः दुसर्‍याच्या जमिनीवर दानशूरपणा करणारे लोक आहेत व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते! परंतु हे समाजाच्या उन्नतीला घातक आहे.
- शेखर गायकवाड

Read More →

shekhar-gaikwadएका साक्षीदाराने कोर्टासमोर साक्ष दिली व साक्षीमध्ये अनेक कागदपत्रांचा उल्लेख केला. या सर्व कागदांवर आपणासमोर सही झाली आहे व त्यातील दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत आपणाजवळ देण्यात आली होती, असे त्याने साक्षीत सांगितले. हे दस्तावेज आज कोर्टात आणले आहेत काय, असे वकिलाने विचारल्यावर रानातल्या झोपडीला आग लागल्यामुळे ही सर्व कागदपत्रे जळून गेल्याचे त्याने सांगितले. झोपडीला आग लागल्याबद्दल पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल का केली नाही, असे कोर्टाने विचारल्यावर, ‘मी महिनाभर यात्रेला गेलो होतो,’ असे त्याने सांगितले. यात्रेवरून आल्यावर तरी फिर्याद का केली नाही, असे विचारल्यावर ‘कुणाविरुद्ध फिर्याद करणार? असा प्रश्‍न पडल्यामुळे तक्रार केली नाही,’ असे सांगितले.

तात्पर्य ः असे बेरकी साक्षीदार आपल्याला समाजात सतत पाहायला मिळतात.
photo

- शेखर गायकवाड
उपसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई

Read More →