नवीन द्राक्षबागेच्या यशाचे गुपित हे त्याच्या खुंटावर तसेच त्यावर करण्यात येणार्‍या कलमांच्या यशस्वीतेवर आधारित असते. मागील महिन्यात बर्‍याच द्राक्ष बागायतदारांनी खुंटावर योग्य जातीचे कलम कुशल कारागिरांकडून करून घेतले आहे. या काळात उपलब्ध असणार्‍या अनुकूल हवामानाचा फायदा बागायतदारांनी करून घेत या काळात कलम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More →

जगभरात फळांपासून बनवलेल्या व त्याचप्रमाणे कार्बोनेटयुक्त सौम्यपेयांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा उत्पादनांसाठी भारत देश ही मोठी बाजारपेठ आहे. उसाच्या रसाकडेदेखील आता एक बाटलीबंद पेय म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. आपला देश ऊस उत्पादनात जगात ब्राझीलपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या उसाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन व साखर कारखान्यांकडून ऊसतोडीसाठी होणारी दिरंगाई यामुळे गूळ बनविण्यासाठी उसाचा काही प्रमाणात वापर होतो आहे; परंतु या पदार्थांना फारसे भवितव्य नाही.

Read More →

‘कोरडवाहू जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बदलत्या हवामानानुसार कमी पाण्यात येणार्‍या डाळिंब व बोरी यासारखी फळपिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, रोग, कीड व वाढलेल्या मजुरीमुळे ही पिके आता मागे पडत असून, अनेक शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना पिलीव (ता. माळशिरस) येथील आनंदराव जाधव या शेतकर्‍याने ‘ड्रॅगन फ्रूट‘ नावाच्या विदेशी ङ्गळ पिकाची केलेली लागवड त्यांना दुष्काळात वरदान ठरली आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या व खायला चविष्ट असणार्‍या या पिकाविषयी संशोधन व त्यासाठी बाजारपेठ वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Read More →

दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारी ही अन्नधान्यासाठी तसेच गुराढोरांना लागणार्‍या कडब्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रब्बी ज्वारीचा पेरणीचा कालावधी फार महत्त्वाचा आहे. ज्वारीची वाढ ही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या ओलाव्यावर अवलंबून असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास येणार्‍या रब्बी हंगामात निश्‍चितच रब्बी ज्वारीचे उत्पादन व उत्पादकता वाढेल.

Read More →

आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत नाही.

Read More →

‘हा त फिरे तेथे लक्ष्मी शिरे’ हे सूत्र लागू पडते ते शेतकर्‍यांना. कारण त्याच्या हातात श्रमाची जिद्द आणि शास्त्राचा आविष्कार एकवटलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजे शेतीचे विज्ञान आणि शेतीची कला यामध्ये मुरलेला आहे. १८ टक्के फक्त सिंचन क्षमता असतानाही राज्यातील शेतकर्‍यांनी जो चमत्कार घडवलाय, त्याचे कारणच शेतीवर असलेली श्रद्धा, निष्ठा व विश्‍वास. तसे गेली तीन वर्षे तुलनेने पाऊसपाणी बरे होते, भावसुद्धा बरे मिळाले. नाही म्हणायला यंदा पोळ्यानंतरचा पाऊस झाला नाही. त्याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत; पण पावसाचे हेलकावे, बाजारभावाची हुलकावणी हे नित्याचे खेळ आपल्याला काही नवे नाहीत.

Read More →

अ कोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन विभागाने कोरडवाहू व केवळ दोन पाण्यांच्या पाळ्यांमध्ये येणारे गव्हाचे वाण संशोधित केले आहे. ‘पीकेव्ही वाशिम – २०१०’ असे या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे. १९९६ मध्ये या वाणाचे संशोधन सुरू करण्यात आले होते व त्याच्या संशोधनासाठी जवळपास १५ वर्षे लागली. हे वाण कोरडवाहू व मर्यादित ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणार असून, या वाणामुळे विदर्भातील गहू उत्पादन वाढू शकेल, असा विश्‍वास गहू संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. नीळकंठ पोटदुखे यांनी व्यक्त केला.

Read More →