मुंबई, ता. २८ : राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत साप्ताहिक आधुनिक किसानच्या संकेतस्थळाला तृतीय पुरस्कार मिळाला. त्याचे वितरण मुंबईमध्ये २७ नोव्हेंबर रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित समारंभात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक किसानच्या वतीने सहयोगी संपादक पंकज जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read More →

नाशिक:(प्रतिनिधी) टंचाईच्या पार्श्वभूमीवर ज्या गाव, वाड्या ,पाडे वस्त्यांवरून पिण्याच्या पाण्याची मागणी होईल त्या त्या ठिकाणी त्वरीत उपाय योजना करण्याच्या सूचना नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी दिल्या तसेच येत्या ५ मार्चला पाण्याचे आवर्तन मनमाड, येवले करांसाठी सोडण्याच्या सूचनाही दिल्या .नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बेठकीत भुजबळ बोलत होते.

Read More →

सोलापूर,ता.२८ ः बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळाल्यानंतर काल (ता.२७) रोजी परिते (ता.माढा) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत वार्‍याच्या वेगाने बैलांचे दावणे प्रेक्षकांनी याची डोळा पाहिले.

Read More →

सोलापूर, ता.२८ ः महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना पिण्याचे पाणी व जनावरांची छावणी मंजूर करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रयत्न करेल, असा विश्‍वास अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी रोपळे (ता.पंढरपूर) येथील शेतकर्‍यांना दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे वीजबिल माङ्ग करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.

बुलडाणा ते सांगली दरम्यान निघालेल्या संवाद पदयात्रा त्यांनी रोपळेच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. डॉ. कदम म्हणाले, ‘ दुष्काळात काही कोणत्या पक्षामुळे आला नाही. तो नैसर्गिक आहे. त्याचा सामना आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाणी पुरवठा व चारा छावण्यांसाठी प्रचंड निधी खर्च करीत आहे. तरीही दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला मानसिक बळ देण्यासाठी या संवाद पदयात्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.‘ या संवाद पदयात्रेत एकहजारहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. हे कार्यकर्त्ये प्रवासात थांबून शेतकर्‍यांना दिलासा देत होते.
(छायाचित्र ः मोहन काळे, सोलापूर)

Read More →

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम हे २०१३ -१४ या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज (गुरुवार) लोकसभेत मांडत आहेत . या अर्थसंकल्पातील या ठळक बाबी

Read More →

राहुल कुलकर्णी
औरंगाबाद, दि. २७ ः साहेब प्यायलाच पाणी नाही तर ङ्गळबागांना पाणी देणार कसे… सुलतानाबाद येथील शेतकरी कारभारी गायके यांनी मरावाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि. २७) आलेल्या केंद्रीय पथकाने विचारलेल्या प्रश्नावर समर्पक उत्तर दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाला केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. पथकाने कृषी, फळबाग, चारा छावण्या, पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेची कामे याबाबतही यावेळी आढावा घेतला. पथकामध्ये सहसचिव संजीव चोप्रा, तसेच उपसचिव प्रदीप इंदुलकर यांचा समावेश होता.

Read More →

मोहन काळे, सोलापूर
सोलापूर, दि.२६ ः सोलापूर जिल्ह्यातील परिते (ता. माढा) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त २५ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचे आयोजन केले होते. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री आठ वाजता संपल्या.

Read More →