अहमदनगर : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा गावातच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने ग्रामपंचायती केवळ सत्तास्थान न राहता सेवा केंद्र बनल्या पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी शेवगांव येथे व्यक्त केली.

Read More →

जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्ङ्गे महात्मा गांधी यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१३ ‘महात्मा गांधी कृषि विचार’ प्रबोधन पदयात्रा आयोजित पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेची सुरूवात गांधी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार नचिकेता देसाई, हरिजन सेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते झुंबरलालजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read More →

अहमदनगर : पारनेर बाजार समितीतील अत्यावश्यक मुलभुत सुविधा व उत्पादक सुविधा वाढविण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम प्रकल्पाद्वारे जागतिक बँक अंतर्गत १ कोटी २० लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी दिली.

Read More →

कोल्हापूर, ता २: केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रीगटाने उसाच्या एफआरपीमध्ये २३. ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे उसाची पायाभूत खरेदी किंमत प्रतिक्विंटल १७० रुपयांवरून २१० म्हणजेच प्रतिटन २१०० रुपये इतकी होणार आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना हा भाव देणे बंधनकारक ठरणार आहे.

Read More →