नाशिक, दि.६ (अतुल भांबेरे) कांदा भाववाढ अल्प कालावधीसाठी राहण्याची शक्यता असून या भाववाढीमुळे केंद्र सरकार निर्यातबंदी करणार नाही, असे मत नाफेडचे संचालक चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली आहे. पोळ व रांगड्ा कांद्याचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुमारे बारा लाख उत्पादन होते. यावर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादनात सुमारे तीन लाख टन कांद्याची लागवड कमी झाली त्याचा परिणाम बाजार आवारात येणार्या आवकेवर झालेला आहे.

Read More →