भंडारा: जिल्ह्यात दुबार पीक क्षेत्र अतिशय कमी आहे. त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी शंभर टक्के एकत्रित प्रयत्न करुन आपण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करु शकतो. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त गोपाल रेड्डी यांनी केले.

Read More →

झाडं लावणं, झाडं जगवणं, गावात स्वच्छता राखणं, गावातील कचऱ्याची चांगली विल्हेवाट लावणं ही तर सगळी गामपंचायतीची कामं, त्याच्याशी आमचा काय संबंध ? त्यांची कामे त्यांनी करावीत, आम्ही कशाला यात सहभागी व्हायचं, यातून आम्हाला काय मिळणार आहे ? ही गावातील लोकांची एकेकाळची मानसिकता. त्यामुळे ग्रामसभेला गावकऱ्यांची उपस्थितीही कमी.

Read More →

औरंगाबाद, दि. 1 : – मराठवाडा विभागातील जिल्हयांमध्ये कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अशा वेळी ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मजूर यांचे साठी नरेगा खऱ्या अर्थाने राबविण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बनकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते

Read More →

पुणे, (विशाल केदारी) ः देशातील शेतशिवारं ङ्गुलवणार्या शेतकर्यांचे अभिनंदन करून केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कृषी अर्थ संकल्प नुकताच सादर केला आहे. विविध पिकांचा वाढीव उत्पादन खर्च लक्षात घेता, अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी २७ , ४०९ , कोटी रुपयांची तरतुद केली आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाकडे चिदंबरम यांनी लक्ष केंद्रीत केले असले तरी, शेती विकासाचा पाया असलेल्या सिंचन क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. निवडणुका गृहीत धरून चिदंबरम यांनी सादर केलेला अर्थ संकल्प, शेती साठी का शेतकर्यांसाठी हे पाहण्याचा हा प्रयत्न…

Read More →

मुंबई (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत २०१३-१४ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील शेतीसाठी महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. ग्रामीण विकासाच्या निधीत ४० टक्क्यांनी वाढ,शेतकऱ्‍यांना एकूण सात लाख कोटींचे कर्ज देणार,कृषी क्षेत्रासाठी २७ हजार कोटींची तरतूद, ग्रामीण विकासासाठी ८० हजार कोटींची तरतूद,शेतकऱ्‍यांना एकूण सात लाख कोटींचे कर्ज देणार,दुष्काळावर मात करण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद, दहा हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कार्यालय या अर्थसंकल्पात सुरु करण्याची तरतूद केली आहे.

Read More →

नवी दिल्ली : बहुचर्चित बाभळी बंधाऱ्‍यासंदर्भात गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 20 हजार एकर सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. तर 50 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे नांदेडमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे, असा आनंद नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Read More →

मुंबई: (प्रतिनिधी) राज्यात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे 11 मीटर उंचीचे दरवाजे उभारण्याच्या दिलेल्या परवानगीमुळे महाराष्ट्राचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले आहे, याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read More →