करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या शहरांमध्ये करवंदाची विक्री करतात. करवंदावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करता येतात व त्यातून अधिक अर्थार्जन होते. या फळाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर एक चांगला उद्योग डोंगराळ भागातील शेतकर्‍यांसाठी उभा राहू शकतो.

Read More →

उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे युवक उद्योग चालू करू शकत नाहीत. म्हणून या लेखामध्ये विविध प्रकारची बिस्किटे कशी बनवायची, याची सखोल माहिती तसेच यासाठी आवश्यक साधनसामग्री व अन्नप्रक्रिया उद्योगासाठीचे शासकीय कार्यालयांचे पत्ते माहितीस्तव देत आहोत. शेतकरी युवक व बचतगट असे उद्योग यशस्वी करू शकतील.

Read More →

राज्यात नुकतीच जनावरांची जनगणना झाली असून दुभत्या जनावरांच्या संख्येत साडेनऊ टक्के वाढ झाली असून दूध उत्पादनातही सुमारे 20 लाख लीटर एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे दुधाळ जातींच्या जनावरांची पैदास करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांनी यांनी सन 2012-13 च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना दिली.

Read More →

अलिकडे अनेक शेतकरी आल्याची (अद्रक) लागवड करून चांगले उत्पादनही घेत आहेत. साधारणत: तीन चार वर्षांपूर्वी काही शेतकर्‍यांना आले लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळाले. त्यामुळे बरेच शेतकरी या उत्पादनाकडे वळाले. परिणामी, उत्पादन वाढले आणि आल्याची किंमत घसरली. शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागले. असे घडू नये, यासाठी आल्यावरील प्रक्रियेचा विचार करणे गरजेचे आहे. आल्यापासून तेल तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक आहे.

Read More →

जगभरात फळांपासून बनवलेल्या व त्याचप्रमाणे कार्बोनेटयुक्त सौम्यपेयांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा उत्पादनांसाठी भारत देश ही मोठी बाजारपेठ आहे. उसाच्या रसाकडेदेखील आता एक बाटलीबंद पेय म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. आपला देश ऊस उत्पादनात जगात ब्राझीलपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या उसाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन व साखर कारखान्यांकडून ऊसतोडीसाठी होणारी दिरंगाई यामुळे गूळ बनविण्यासाठी उसाचा काही प्रमाणात वापर होतो आहे; परंतु या पदार्थांना फारसे भवितव्य नाही.

Read More →