नाशिक ( अतुल भांबरे) ः शेतकर्यांना कांदा चाळींचे थकलेले अनुदान एप्रिल महिन्यापर्यंत देण्यात येईल असे आश्वासन कृषी विभागाचे मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिले. चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानतर्ङ्गे कांद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि त्याचे नियोजन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी गोयल मार्गदर्शन करताना बोलत होते.

Read More →

औरंगाबाद दि.१२ : बाजार समित्यांनी व्यापार्यांची पाठराखण न करता शेतकरी हिताचे काम करावे, असे आवाहन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. औरंगाबाद येथे मंगळवारी (दि.१२) टंचाई निवारणार्थ आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Read More →

नाशिक, दि.६ (अतुल भांबेरे) कांदा भाववाढ अल्प कालावधीसाठी राहण्याची शक्यता असून या भाववाढीमुळे केंद्र सरकार निर्यातबंदी करणार नाही, असे मत नाफेडचे संचालक चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केली आहे. पोळ व रांगड्ा कांद्याचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुमारे बारा लाख उत्पादन होते. यावर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात कांदा उत्पादनात सुमारे तीन लाख टन कांद्याची लागवड कमी झाली त्याचा परिणाम बाजार आवारात येणार्या आवकेवर झालेला आहे.

Read More →

अहमदनगर : पारनेर बाजार समितीतील अत्यावश्यक मुलभुत सुविधा व उत्पादक सुविधा वाढविण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम प्रकल्पाद्वारे जागतिक बँक अंतर्गत १ कोटी २० लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी दिली.

Read More →

नाशिक (अतुल भांबेरे) : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढली असून, दरातही वाढ झाली आहे. सध्या सरासरी कांद्याला १४०० रुपये प्रती क्विन्टलला दर मिळत आहे. पण कांदा लागवडीत यंदा पुरेश्या पाण्या अभावी घट झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन निम्याने घटले आहे. परिणामी या भाव वाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होतो आहे.

Read More →

kapde-logoद्राक्ष आणि डाळिंब यासारखी बागायती पिके शेतकरी जीवापाड कष्ट घेऊन पिकवतात; पण अनेकदा मार्केटचा प्रश्‍न येतो. बाजारभाव पाहिजे तसे मिळत नाहीत म्हणूनच शेतकर्‍यांना या पिकांच्या बाजारपेठेची स्थिती कळावी आणि त्यातून त्यांना शेतमाल विक्रीच्या निर्णयासाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने ही लेखमाला सुरू करत आहोत.

महाराष्ट्राच्या गोड द्राक्षाला यंदाच्या हंगामात बाजारपेठेत शिरकाव करताना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. उत्तर भारतात सध्या हैदोस घालणारी थंडी द्राक्षाचे बाजारभाव रोखून धरतेय. आतापर्यंत ११ जणांचे बळी घेणारी ही थंडी उत्तरेतील बहूतेक राज्यांतील फळांच्या बाजारपेठेत शत्रूच्या भिंतीसारखी उभी आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी दोघांनाही थंडीचा मागोवा घेत सावध पावले टाकावी लागतील.

Read More →

नांदेड( रमेश पांडे) : नांदेड जिल्ह्यात यंदा शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन ही दोन पिके घेण्यावर भर दिल्याने या पिकांचे मोठ्याप्रमाणावर मोठे उत्पादन झाले परंतु शासनाने या दोन्ही पिकांना कमी भाव जाहीर केल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन बाजार न आणता घरातच साठवूण ठेवणे पसंत केले. शासन आज ना उद्या कापूस, सोयाबीन या पिकांना चांगला भाव जाहीर करेल या आशेवर शेतकरी आहेत.

Read More →