राजस्थानात मोठ्या प्रमाणात होणार्‍या ‘गवारगम’ या पिकाला देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. सर्वत्र गाजावाजा सुरू असलेल्या ‘गवारगम’ पिकाविषयी कृषी अधिकारी व तज्ज्ञांकडून माहिती घेऊन माझ्या शेतात ‘गवारगम’चा प्रयोग करण्याचे ठरविले.

Read More →

उतिसंवर्धित केळीची लागवड कशाप्रकारे करायची याची माहिती आपण या लेखाच्या पहिल्या भागातून घेतली. लेखाच्या दुसर्‍या भागात आपण खतव्यवस्थापन, विद्राव्य खतांची फवारणी, आंतरमशागत यांच्यासह लागवडीनंतरच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊ…

रासायनिक खतव्यवस्थापन
केळी हे १२ ते १३ महिन्यांचे पीक असून, या पिकास रासायनिक खते जास्तीतजास्त पहिल्या पाच महिन्यांत देणे आवश्यक आहे. केळीच्या दर खोडाला २०० ग्रॅम नत्र अधिक ४० ग्रॅम स्फूरद अधिक ३०० ग्रॅम पालाश देणे आवश्यक आहे. रासायनिक खतांपैकी सुपर ङ्गॉस्ङ्गेट लागवडीपूर्वी खड्ड्यात देणे ङ्गायद्याचे आहे. रासायनिक खते केळीच्या बुंध्यापासून १५ ते ३० सेंटिमीटर अंतरावर आ

Read More →

सोलापूर जिल्ह्यातील जांभूड येथील शेतकरी राजू इनामदार यांनी एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचे उत्तम व्यवस्थापन करून वाया गेलेली केळीची बाग वाचविली. अशा परिस्थितीत त्यांनी गतवर्षी केळीचे एकरी ३४ टन सरासरी उत्पादन मिळविण्याची किमया साधली आहे. खर्च वजा जाता दोन एकरातून त्यांना पहिल्या वर्षी साडेतीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

Read More →

केळीच्या पिकावर पडणारा हा रोग भारतात १९४३ साली श्रीलंकेतून आला. आजमितीला देशपातळीवर हा केळीवरील मुख्य रोग आहे. हा रोग आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागांत आढळतो. एकट्या केरळ राज्यात या रोगामुळे केळीचे ४० कोटी रुपयांचे नुकसान होते. बंची टॉप रोगामुळे तामिळनाडूच्या पलनी डोंगराळ भागातून वीस पेक्षा जास्त जातीच्या केळी जवळपास पूर्ण नष्ट झाल्या आहेत, सेखराय डोंगरांमध्येही या रोगाचा ६० टक्क्यांपर्यंत प्रादूर्भाव आहे.

Read More →

नागपुरातील तेलंगखेडी परिसरातील दीड एकर परिसरात साकारलेल्या महाबीज जैवतंत्रज्ञान केंद्राने आजवर हजारो शेतकर्‍यांना टिश्युकल्चर रोपे पुरविली आहेत. या केंद्रात कुशल तंत्रज्ञांसह लॅमिनेर, एअरफ्लो, ऍटोक्लेव्ह, डबल डिस्टिल्ड वॉटर अशी सुसज्ज यंत्रे असून, येथे दरवर्षी केळीची ७० ते ७५ हजार रोपे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेतकर्‍यांना पुरविली जातात. अशा या उतिसंवर्धित रोपांच्या लागवडीबद्दल…

Read More →

जगात केळी उत्पादनात भारत, ब्राझिल, इंडोनेशिया, ङ्गिलिपाईन्स, चीन, इक्वाडोर हे देश अग्रेसर आहेत. या देशांच्या तुलनेत केळी उत्पादनात भारत अग्रस्थानी अग्रेसर आहे. केळी निर्यातीमध्ये भारताचा ४२ वा क्रमांक लागतो. भारतातून प्रामुख्याने अरब देश व शेजारील देशांना केळीची निर्यात केली जाते. केळी निर्यातीची योग्य काळजी घेतली तर भारतीय शेतकर्‍यांनाही निर्यातीत संधी आहे.

Read More →

महाराष्ट्रातील जळगाव (खान्देश), गुजरातमधील नवसारी भाग, तामिळनाडूतील थेनी व आंध्र प्रदेशातील पुलुवेंदुला हे भारतातील केळी उत्पादक प्रमुख भाग. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून क्रम लावल्यास जळगाव तिसर्‍या अथवा चौथ्या क्रमांकावर येईल. गुणवत्ता अथवा दर्जा कसा ठरवायचा, या प्रश्‍नाला उत्तर आहे मालाला मिळणारा दर.

Read More →