दूध हा अल्पकाळ टिकणारा नाशवंत पदार्थ आहे; पण प्रक्रियेमुळे त्याची गुणवत्ता व आयुष्य वाढते. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तसेच उद्योेेजकांनी जर नवीन तंत्रज्ञान, संशोधन, प्रक्रिया यासारख्या बाबींचा विचार करून व्यवसायात परिवर्तन केल्यास यश निश्‍चित मिळेल. याशिवाय उद्योजकाला या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

Read More →

देवळाली प्रवरा (जि. अहमदनगर) येथील गणेश बाळासाहेब भांड या युवकाने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने दूध संकलन करण्याचे ठरविले. हे करत असताना स्वत:च्या मालकीचा दूध प्रकल्प असावा, असे स्वप्न पाहिले आणि खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत अथक प्रयत्नांतून स्वत:च्या शेतवस्तीवर ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ नावाने हा दूध प्रकल्प सुरूही केला.

Read More →

सोलापूर जिल्ह्यातील भोसे या गावातील मुळे बंधूंनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दूध व्यवसाय सुरू केला आणि नंतर दुधापासून खवा बनविण्याचा व्यवसायही चालू केला. अखंड मेहनत, व्यवस्थापनाच्या जोरावर पाहता पाहता खवा व्यवसायातून त्यांनी चांगलीच आर्थिक प्रगती साधली. शेतीही सुधारली. दुष्काळी परिस्थितीतही मुळे बंधूंचा हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.

Read More →

दूध मुबलक नाही म्हणून ग्राहक सांगतो. दूध उत्पादन पुरेसे नाही म्हणून सरकार योजना राबविते. दुष्काळात दूध उत्पादनात घट होतेय, असे चिलिंग प्लँट व्यावसायिक सांगतात. प्रत्यक्षात दुधाचा पुरवठा अतिरिक्त आहे म्हणून शेतकर्‍यांचे दूध विकत न घेणे, त्यांना भाव कमी देणे असे उद्योग खासगी दूध कंपन्या आणि दुधाचे दलाल करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्याला रास्त दूध दराची प्रतीक्षा आहे. या सगळ्यामागचे वास्तव काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय ‘आधुनिक किसान’ने.

नगर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत कुकडी धरणातून पाण्याचे लोट आणण्याची लोकप्रिय घोषणा ठरलेली. वर्षानुवर्षे या अवर्षणप्रवण तालुक्याने याच मुद्यावर नेत्यांना मोठे केले. नेत्यांनीही तरुणांना कामाला लावणार्‍या उद्योगांपेक्षा निवडणुकीसाठीचे ङ्गंडे वापरून राजकारणाच्या ङ्गडात रंग भरून उखळ पांढरे करून घेतले. त्यापैकीच एक राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले गाव म्हणूनही रेल्वेचे स्टेशन असणार्‍या सारोळा कासारचा उल्लेख करावा लागेल.
या गावातील हजार एकर पडिक
जमिनींसह शेजारील घोसपुरी, चिखली, हिवरे झरे या गावांतील जमिनींसाठीही नगर व पुणे-मुंबईतील गुंठामंत्र्यांच्या चकरा ठरलेल्या असतात. गावातील अनेकजण शेतीला कंटाळल्याने एमआयडीसी किंवा कशातही जमिनी गेल्यानंतर मिळणार्‍या पैशांची चातकासारखी वाट पाहतात. मात्र, तरीही काही शेतकरी दुष्काळावर मात करण्याचा चंग बाधून शेतीसह पशुपालनाचा धंदा करून टामटुमीत जगताना याच गावात दिसतात. या गावाला रेल्वेचा परिसस्पर्श लाभल्याचाही मोठा ङ्गायदाच झाला आहे. कारण मागील तीस वर्षांत सहकारी दूध डेअर्‍यांना बरकत असतानाही सारोळकर शेतकरी सकाळच्या पुणे-मनमाड पॅसेंजर गाडीतून नगरला दुधाचे रतीब घालण्यासाठीच जात होते. काळानुरूप मोटारसायकलींचा घरोघर राबता वाढल्याने आता मोजकेचे दुग्धोत्पादक शेतकरी रेल्वेने नगरला दूध देतात. आता गावातील दूध टँकरने थेट पुणे शहरातील मगरपट्टा सिटीतील उच्चभ्रू वस्तीची भल्या सकाळी चहाची लज्जत वाढवीत आहे.
सारोळकरांचा दिवस भल्या पहाटेच सुरू होतो. दहा वर्षांपूर्वी तर सहकारी व शासकीय डेअर्‍यांची चलती असताना दूधवाल्यांना पहाटे तीनलाच उठून कामाला जुपून घ्यावे लागत. आता निवांत सहाला उठले तरी चालते. कारण खाजगी प्लँटवाल्यांच्या दूध संकलनाच्या गाड्या थेट शेतकर्‍यांच्या घरांपर्यंतही येऊ लागल्या आहेत. गावातील ६० टक्के शेतकर्‍यांकडे म्हशी असून म्हशीचे दूध थेट नगरकरांना रतिबाने देण्यातच मोठा ङ्गायदा होत असल्याचे पशुपालक शेतकरी संजय खेंगट सांगतात. ते म्हणाले की, आम्ही डेअरीला म्हशीचे दूध घातल्यास वीस रुपये लिटरचा भाव मिळतो, तर थोडे कष्ट घेऊन मोटारसायकलद्वारे नगरला जाऊन रतीब घातल्यास ३५ ते ४० रुपये लिटरचा भाव मिळतो.

गावातील उच्चशिक्षित तरुण सागर गुलाबराव काळे यांनी घेतलेल्या पुढाकाराने काळाबरोबर चालत येथील दूध उत्पादकांनी खाजगीकरणातून उदारीकरणाकडेही वाटचाल केली आहे. याविषयी काळे सांगतात की, मागील वीस वर्षांपासून मी गावातील शेतकर्‍यांना सहकारी डेअर्‍या व रतीब घालताना पाहतोय. काळानुरूप झालेल्या बदलातून सहकारी डेअरीला घरघर लागल्याने आमच्या दुष्काळी तालुक्यात खाजगी डेअर्‍या सुरू झाल्या. परिणामी, शेतकर्‍यांना दूध विकण्याचे पर्याय मिळाले. पण, त्याचवेळी जागतिक बाजारातील न्यूझिलंड, नॉर्वे, स्वीडन आदी देशांतील दुधाची पावडर व दुग्धजन्य पदार्थांनी
मोठ्या शहरातील मार्केटवर कब्जा केल्याने आपल्याकडे अजूनही शेतकर्‍यांना चांगला भाव मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. थंड प्रदेशात होलस्टन ङ्ग्रिजिअन, जर्सी यांसारख्या गाई भरपूर दूध देतात. त्याच गाई आपल्याकडील उष्ण हवामानामुळे तत्काळ आजारांना बळी पडतात. परिणामी, आपल्याकडे अजूनही संकरित गाईंंची टक्केवारी कमीच ठेवावी लागत आहे. कमी टक्केवारीमुळे दुधाच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होणे साहाजिकच आहे.
हवामानासह दुष्काळही शेतकर्‍यांची पाठ सोडत नसल्याने आपल्याकडे दूध धंद्याला अजूनही चांगले दिवस येण्याची वाट पाहावी लागतेय. आम्ही पुण्यात दूध नेण्यास सुरुवात केल्याने गावातील शेतकर्‍यांचाही ङ्गायदा झाला आहे. सध्या पुण्यात तीन तर नगरमध्ये दोन हजार लिटर दूध कोणतीही प्रक्रिया न करता विकले जात आहे. लवकरच गावच्या दुधाच्या ब्रँडने प्रक्रिया न केलेल्या स्वच्छ दुधासह होमोजिनाईज्ड व पाश्‍चराईज्ड दुधाच्या पॅकिंग केलेल्या पिशव्या विकण्यासाठीचे युनिट टाकण्यासाठी आम्ही गावकरी प्रयत्नशील आहोत.

येथील पशुपालक मुकिंदा धामणे सांगतात,‘‘माझ्या वडिलांनी दुधाच्या धंद्यावरच आम्हा भावंडाना मोठं केलं. सोसायटीच्या डेअरीत दूध घालतानाच
आमचं शिक्षण झालं अन् अजूनही दूध काढूनच जगतोय. किराणा दुकानात असलेल्या वाणसामानाचे रेट सहा महिन्यांत वाढताना पाहतोय. त्यामुळं किराणा
सामानाच्या यादीचा आकडाही वाढतोय. पण, याचवेळी आमच्या शेतीतून पिकलेल्या मालाबरोबर दुधाचा भाव वाढण्यापेक्षा दुष्काळातही कमीच झालाय. नेमकं कोणतं गणित लावून सरकार आमच्या दुधाला पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी भाव देतं, याचंच आम्हाला कोडं पडलंय.’’
पशुपालक आणि शेतकरी असलेले संदीप जाधव म्हणाले, ‘‘आम्ही दहा वर्षांपासून जर्सी गाईच्या दुधाचा धंदा करतो. पाच वर्षांपूर्वी गावात असलेल्या सोसायटीत कमी भावातच दूध घालायचो. ती बंद पडून खाजगी चिलिंग प्लँटवाल्यांच्या संकलन केंद्रांना सुरुवात झाल्यावर पहिली तीन वर्षे चांगली गेली; पण आता सरकारने भाव कमी केल्याने व त्यातच खाजगीवाल्यांनी मनमानी केल्याने आमची गोची होतेय. नगरच्या एमआयडीसीत असलेल्या डेअर्‍यांनी अनेकदा जास्तीचे दूध आल्याने फगॅट किंवा डिग्री कमी असल्याची बतावणी करून दुधाचे कॅन मागे पाठवलेत. या धंद्यावरचे सरकारी नियंत्रण ङ्गक्त भावापुरतेच असल्याचा हा परिणाम आहे. सरकारबरोबरच खाजगीवाले आमच्या दुधाला वाली नसल्यासारखेच दिसतेय.’’

डॉ. श्रीकांत देशपांडे हे येथील खासगी पशुचिकित्सक आहेत. गावात होणार्‍या दुग्धक्रांतीचे आणि त्याअनुषंगाने होणार्‍या परिणामांचे ते अनेक वर्षांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे यासंदर्भात ते अभ्यासूपणे भाष्य करतात. ते म्हणतात,‘‘ दुधाचा धंदा म्हणजे मोठी तारेवरची कसरत असते. आपल्याकडील गावरान, खिलार व सिंधी गाईंना कमी दूध येते, तर जर्सी गाईंना चांगले दूध येऊनही आजारावरील औषधांचाही खर्च मोठाच असतो. मग या त्रांगड्यात अडकलेल्या पशुपालक शेतकर्‍यांना या जोडधंद्यातून अनेकदा तोटाच होतो. जागतिक मार्केटचा परिणाम थेट दिसत असल्याने आपल्याकडील दुधाला अजूनही कमीच भाव मिळतो. रोजचा वैरण-पाण्याचा खर्च आता दुष्काळात वाढला आहे. त्यामुळे एका लिटरसाठी सरासरी शेतकर्‍यांना मजुरीसह वीस ते बावीस रुपयांचा खर्च होत आहे, तर बाजारभावानुसार ङ्गक्त पंधरा लिटरचा भाव मिळत असल्याने काबाडकष्ट करून जगविलेल्या जनावरांकडून आता या शेतकर्‍यांना फुकटातच ही कसरत करावी लागत आहे.’’
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या नाकावर टिच्चून सारोळकरांनी ‘धवलक्रांती’ केली आणि स्वत:चा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नांतून आता या गावातील दूध थेट पुण्यासारख्या शहरात जात आहे. मात्र, शासकीय पातळीवर मिळणारे कमी दर आणि खासगी दूध प्लँटवाल्यांची मनमानी यामुळे गावकर्‍यांचा दुधव्यवसाय अडचणीत आहे. एकीकडे दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणारे शासन, शेतकर्‍याला, पशुपालकाला मिळणार्‍या कमी दूध दराबाबत काहीच पुढाकार घेताना दिसत नाही. त्यातून शेतकर्‍यांच्या मनोधर्यावर परिणाम होत असल्याची टिप्पणी गावातील जाणकार करत आहेत. दुसरीकडे पशुपालकही दूध दरासंदर्भातील वाढीची मागणी करत आहेत. त्यांना योग्य भाव मिळाला तरच सारोळा सारखी अनेक गावे दुधव्यवसायाच विश्‍वासाने पुढे येतील आणि खर्‍या अर्थाने धवलक्रांतीचे सरकारचे स्वप्न साकार होईल.

काय आहे गौडबंगाल?
वर्षापासून मी नगरमध्ये दुधाचे रतीब घालतोय. मागील वर्षी गावातील खासगी डेअरीच्या संकलन केंद्र चालकाने सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा प्रतिलिटर २ रुपयांचा भाव कमी दिला. यावर दुसर्‍या डेअरीकडे दूध घालणे सुरू केले.केले. पण, त्यानेही एकाच महिन्यात मला कमी भाव झाल्याचे सांगितले. मी त्यास विरोध दर्शिवाल्याने सलग दोन दिवस माझे दूध कमी फॅटचे असल्याचे कारण देऊन दूध मागे पाठविले. त्यानंतर मी डेअरीकडे दूध पाठविणे बंद केले आणि थेट नगर शहराच्या सावेडी भागात रतीब घालण्यास सुरुवात केली. खासगी डेअरीवाले मला १८ रुपयांचा भाव देण्यास तयार नव्हते पण रतिबाने मला ३० रुपयांचा भाव मिळतोय. आताही सरकारने भाव कमी केले आहेत. सरकार दुधाचे उत्पादन
जादा असल्याचे सांगून भाव कमी करीत असल्याचे गौडबंगाल आम्हा शेतकर्‍यांना अजूनही समजलेले नाही. पिशव्यांची पॅकिंग करताना कस काढलेल्या दुधाला तीस लिटरचा भाव सरकार देत असतानाच दूध उत्पादक शेतकर्‍यावर सर्रास अन्याय होत आहे. दुधाला आता सरकारने २५ ते ३० रुपयांचा फिक्स भाव देण्याची गरज आहे.
- संजय खेंगट, पशुपालक शेतकरी
मो. ९७३०५६९९५१

जादा भाव देणे परवडत नाही
शेतकर्‍यांचा दुधाचे भाव कमी झाल्यावर होणारा संताप मान्य आहे. मात्र, जागतिक बाजारातील आयात केलेल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती आपल्याकडील दुधापेक्षा कमीच असतात. परिणामी, इच्छा असूनही आम्ही खासगीवाले
जास्त भाव देऊच शकत नाही. दुष्काळाने दूध कमी संकलित होत असले तरी, आयातीत दूध भुकटीमुळे भाव वाढलेले नाहीत. परदेशी कमी भावाच्या दूध पदार्थांचा हा परिपाक आहे. दुष्काळाने पिचलेल्या शेतकर्‍यांना दुधाचा जोडधंदा चांगला आहे. मात्र, त्यातील काही शेतकरी आम्हा प्लँटवाल्यांकडून मोठ्या रकमेच्या उचली घेऊनही बुडवितात. त्यामुळे यात मोठी रिस्क असते.
- सुरेश सुंबे, संचालक, प्रियदर्शिनी डेअरी, अहमदनगर, मो. ९३२६१५१०७९

- सचिन चोभे / अहमदनगर

Read More →

राज्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात माहिती तंत्रज्ञानाचा देखिल वापर करण्यात येणार आहे. “राज्यातील गाई-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम” असे या राज्यस्तरीय योजनेचे नाव असून ती चालू वर्षापासून राज्यात राबविण्यात येईल.

Read More →

राज्यात नुकतीच जनावरांची जनगणना झाली असून दुभत्या जनावरांच्या संख्येत साडेनऊ टक्के वाढ झाली असून दूध उत्पादनातही सुमारे 20 लाख लीटर एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे दुधाळ जातींच्या जनावरांची पैदास करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांनी यांनी सन 2012-13 च्या पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना दिली.

Read More →