नागपूर ः सेंटर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर (सी.एस.ए.) तर्फे ‘बदलत्या हवामानामुळे शेतीतील बदलती समिकरणं’ विषयावरील चर्चासत्र पार पडले. अनियमीत पावसाने शेतकर्यांवर येणारी दुबार किंवा तिबार पेरणीची स्थिती, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल, महागडे बियाणे व कृषीनिवीष्ठा, नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव, शेतमालाचे अस्थिर दर अशा कारणांमुळे विदर्भातील शेती आणि शेतकरी नेहमीच अडचणीत असतो असा सुर, या कार्यशाळेतून निघाला.

Read More →

नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या आणि शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाचा असलेला सिंचन गैरव्यवहारासंदर्भात महाराष्ट्र सरकारतर्फे लवकरच विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्यात येणार असल्याचे आज सरकारच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनात जाहीर करण्यात आले.

Read More →

शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत राज्य शासनाने राज्यातील नोंदणीकृत 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांच्या विम्यापोटी 3 हजार 151 लाख रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांकडे भरला असल्याऱची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

Read More →

नागपूर : राज्याची झालेली दुरवस्था चिंताजनक आहे. जनतेच्या समस्यांना तडीस लावणे हेच शिवसैनिकांचे ध्येय असून विरोधकांचा समाचार घेण्याची वेळ आली आहे. कस्तुरचंद पार्कवर झालेल्या मेळाव्याप्रमाणेच एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन जानेवारीनंतर करावयाचे असून विरोधकांचा थेट समाचार देखील घ्यायचा असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले.

Read More →

नागपूर : विदर्भातील मुख्य पिके म्हणून सोयाबीन, कापूस, धानाची ओळख आहे. सोयाबीन तेल, ढेप, उत्पादनांची मागणी वाढून त्याचे दरात वाढ असूनही शेतकर्‍यांच्या सोयाबीनला दर मिळत नसल्याची शोकांतिका आहे. दुष्काळी परिस्थिती, उत्पादनखर्चात वाढ, उत्पादन व मिळणारे दर कमी, मजुरटंचाई हीच परिस्थिती कापूस आणि धान पिकाची देखील आहे. विदर्भातील प्रश्‍न सोडवीण्याकरिता नागपुरात तिसरे अधिवेशन होते त्यामुळे येथील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. याकरिता विदर्भातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन माजी आमदार पाशा पटेल यांनी केले आहे.

खाद्य तेलावर आयात शुल्क लावणे, डी.ओ.सी. वरील रद्द केलेले आयातशुल्क लावणे, २० टक्के अधिक भाव देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याचे शिङ्गारस केंद्राकडे करणे आदी मागण्या शासनाने मान्य करणे देखील अगत्याचे असल्याचे पाशा पटेल यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

Read More →

नागपूर (अश्‍विन सवालाखे) : शेतीमालाला भाव नाही, ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, नापिकीमुळे अंगावर साचलेले कर्ज आणि शासनाचा तुघलकी कारभार अशा अशा चौफेर मार्‍यात भरडलेल्या शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे दुर्दैवी सत्र अजूनही थांबता थांबेना. खरिपाचा पैसा पदरी पाडून रब्बीचा पेरा आटोपण्याच्या काळात बळीराजा आपले आयुष्य संपवित असल्याचे विदारक चित्र विदर्भात दिसत असून आठवड्यात दहा शेतकर्‍यांनी मृत्युला कवटाळले.

Read More →

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसु) १२ व्या वर्धापनदिनानिमीत्त नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे रामदासपेठ येथील पशुचिकित्सालयात सोमवारी (ता.२) पशू रोगनिदान, उपचार शिबीर झाले. कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

Read More →