अहमदनगर जिल्ह्यातील कनकुरी (ता. राहाता) येथील शिवाजी मारुती दुशिंग यांनी ऊस पिकाला रामराम ठोकून डाळिंबाची लागवड केली. पदार्पणातच त्यांनी अडीच एकरांवर टिश्यू कल्चर डाळिंबाची बाग फुलवत पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या टिश्यू कल्चर डाळिंब शेतीची प्रेरणा घेऊन अनेक शेतकर्यांनी आपापल्या गावांत बरड माळरानाला ‘हिरवा साज’ चढविला आहे. अगदी अठरा महिन्यांतच भरघोस उत्पन्न मिळवून देणारे हे टिश्यू कल्चर डाळिंब कृषी विभागाच्याही कौतुकाचा विषय ठरले आहे. …
Read More →
